मुंबईत लवकरच पाच मजली मासळी बाजार उभारण्यात येणार आहे. स्थानिक संस्कृती आणि अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असा हा आंतरराष्ट्रीय मासळी बाजार उभारण्यात येणार आहे.
अंधेरीच्या जे.बी. नगर येथे पाच मजल्यांचा हा बाजार उभारण्यात येणार असून त्यासाठी 138 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या बाजाराच आराखडा ठरवण्यात आला असून त्याच्या मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.
स्थानिक मासळी बाजारांची स्थिती सुधारण्याबरोबरच मच्छिमारांसह विक्रेत्यांनाही दर्जेदार सोयीसुविधा पुरविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असा आंतरराष्ट्रीय दर्जाचा मासळी बाजार उभारण्यात येणार आहे.
अंधेरी पूर्व पर्यावरणपूरक इमारत मासळी बाजारात सर्वांत मोठी समस्या असते ती माशांचे उरलेले तुकडे आणि कचऱ्याची. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ‘एआय’ची मदत घेण्यात येणार असून, भूमिगत कचराकुंड्या आणि स्मार्ट सेन्सर आदींचा वापर करण्यात येणार आहे.
विजेबाबत इमारत स्वयंपूर्ण असावी यासाठी सौरऊर्जा पॅनलचा अंतर्भावही इमारतीत करण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या दोन किलोमीटरवर ही जागा असून मेट्रो स्थानकही येथून जवळ आहे. या बाजाराची इमारत पर्यावरणपूरक असेल ज्यात कमीत कमी कचऱ्याची निर्मिती होणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) गेल्या आठवड्यात मुंबईच्या सहा समुद्रकिनाऱ्यांवरून 950 मेट्रिक टनांहून अधिक कचरा उचलला. 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पाऊस आणि भरती-ओहोटीनंतर ही स्वच्छता करण्यात आली. यामुळे शहराच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात कचरा साचला.
महापालिकेने गिरगाव चौपाटी, दादर-माहीम, जुहू चौपाटी, वर्सोवा, मधमारवे आणि गोराई समुद्रकिनाऱ्यांवर विशेष मोहीम सुरू केली. 15 ऑगस्ट ते रविवार दररोज 380 बीएमसी कर्मचाऱ्यांनी सहा मशीनसह कचरा साफ करण्यासाठी काम केले.
जुहू बीचवर सर्वाधिक कामगारांची संख्या दिसून आली. आठ दिवसांत 150 कर्मचाऱ्यांनी 365 मेट्रिक टन कचरा उचलला. वर्सोवा बीचवर 120 कामगारांनी 200 मेट्रिक टन कचरा गोळा केला. दादर-माहीम बीचवर 48 कामगार होते, ज्यांनी 300 मेट्रिक टनांपेक्षा जास्त कचरा साफ केला.
गिरगाव चौपाटी, मधमारवे आणि गोराई समुद्रकिनाऱ्यांवर लहान पथकांनी काम केले. त्यांनी अनुक्रमे 23 मेट्रिक टन, 34.5 मेट्रिक टन आणि 20 मेट्रिक टन कचरा उचलला.
शुक्रवार, 22 ऑगस्ट रोजी माहीम समुद्रकिनारा प्रचंड प्रदूषित दिसला. समुद्रातील कचरा किनाऱ्यावर पसरलेला पाहायला मिळत होता. अनेक ठिकाणी, विशेषतः रेती बंदरजवळ, जिथे मिठी नदी अरबी समुद्रात वाहते, तिथे कचरा साचला होता.
अहवालांनुसार, मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर कचरा साचण्याचे मुख्य कारण मुसळधार पाऊस आणि भरती-ओहोटी होती, अशी पुष्टी बीएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली.
महाराष्ट्र सरकार लाडकी बहिण योजनेचा चुकीचा फायदा घेणाऱ्यांवर अंकुश लावण्याची तयारी करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगितले की, या योजनेचा बेकायदेशीर लाभ घेणाऱ्यांची चौकशी करून त्यांना लाभ घेण्यापासून रोखले जाईल.
त्यांनी पुधे सांगितले की, बेकायदेशीर लाभ घेणाऱ्या 26 लाखांहून अधिक लाभार्थ्यांची चौकशी केली जात आहे. सरकारने लाभार्थ्यांचे ई-केवायसी करण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, जर चौकशीत कोणी चुकीचे लाभ घेत असल्याचे आढळून आले तर त्याचे खाते तात्काळ बंद केले जाईल. मुख्यमंत्री म्हणाले की, काही लोक योजनेचा चुकीचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे.
या योजनेअंतर्गत, प्रति कुटुंब 21 ते 65 वर्षे वयोगटातील जास्तीत जास्त दोन महिलांना लाभ मिळतो. परंतु अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात लाभार्थ्याचे वय निर्धारित मर्यादेबाहेर आहे, तरीही त्या दरमहा 1500 रुपयांची मदत घेत आहेत.
तसेच, अशी प्रकरणे देखील समोर आली आहेत जिथे एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला या योजनेचा लाभ घेत आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या योजनेचा उद्देश योग्य पात्र महिलांना मदत करणे आहे, परंतु आता मोठ्या संख्येने चुकीचे दावेदार पुढे येत आहेत. चौकशी पूर्ण झाल्यानंतर, बेकायदेशीर दावेदारांना लाभांपासून वंचित ठेवले जाईल. सरकार लवकरच एक अहवाल प्रसिद्ध करेल, ज्यामध्ये किती लोक चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेत होते हे स्पष्ट होईल.
एमएस धोनी क्रिकेट इतिहास के महानतम विकेटकीपरों में से एक रहे. इंटरनेशनल क्रिकेट में सबसे ज्यादा स्टंपिंग का रिकॉर्ड उन्हीं के नाम है, जिन्होंने अपने करियर में 195 बार किसी बल्लेबाज को स्टंप आउट किया. साल 2016 में ऑस्ट्रेलिया के खिलाफ आई एक स्टंपिंग ने बतौर विकेटकीपर धोनी का कद और बढ़ा दिया था. ऑस्ट्रेलियाई खिलाड़ी एलेक्स कैरी ने उस घटना को याद करते हुए एमएस धोनी को जीनियस (MS Dhoni Genius) बताया है.
यह बात है 29 जनवरी, 2016 की, जब मेलबर्न में भारत और ऑस्ट्रेलिया का टी20 मैच खेला गया. ऑस्ट्रेलियाई टीम 185 रनों के लक्ष्य का पीछा कर रही थी. जेम्स फॉकनर नंबर-7 पर बैटिंग करने आए और 10 रन बना चुके थे. 17वें ओवर में रवींद्र जडेजा बॉलिंग करने आए, जिसकी आखिरी गेंद पर गेंद ने फॉकनर के बैट का अंदरूनी किनारा लिया, जिसके बाद बॉल धोनी के पैड से लगकर स्टंप्स से जा टकराई. धोनी की नजर इतनी तेज थी कि उन्होंने फॉकनर का पैर हवा में उठता देख स्टंप की अपील कर दी और वो वाकई में आउट हो गए थे.
धोनी जीनियस हैं…
गेंद ने जेम्स फॉकनर के बैट का किनारा लिया, फिर धोनी के पैड से टकराने के बाद स्टंप्स से जा लगी. यह सब देखने में एक संयोग नजर आता है क्योंकि महज क्षण भर में यह पूरी घटना घटी. फिर भी एलेक्स कैरी मानते हैं कि धोनी असल में यही चाहते थे कि गेंद स्टंप्स से जा टकराए.
क्रिकेट ऑस्ट्रेलिया द्वारा सोशल मीडिया पर एक वीडियो क्लिप साझा किया गया है, इसमें एलेक्स कैरी ने बताया, “धोनी, एक जीनियस हैं, वो शायद ऐसा ही करना चाहते थे. यह उन्होंने जानबूझकर किया था, क्योंकि वो एमएस धोनी हैं.”
एशिया कप 2025 की शुरुआत 9 सितंबर से होनी है. इस बार एशिया कप के खिताब के लिए 8 टीमों के बीच टक्कर होगी. यह एशिया कप का 17वां संस्करण होगा. इससे पहले जान लीजिए बीते 16 संस्करण में किस टीम ने सबसे ज्यादा फाइनल खेले हैं.
एशिया कप के इतिहास में सबसे ज्यादा फाइनल खेलने का रिकॉर्ड श्रीलंका के नाम है. श्रीलंका ने कुल 12 बार एशिया कप के फाइनल में जगह बनाई है. जिसमें से 6 बार उसने खिताब जीता है.
इस लिस्ट में दूसरे नंबर पर भारत है. भारत ने कुल 11 बार एशिया कप का फाइनल खेला है. इस दौरान भारतीय टीम ने 8 बार खिताब अपने नाम किया है.
पाकिस्तान टीम इस लिस्ट में तीसरे स्थान पर है. पाकिस्तान ने 5 बार एशिया कप के फाइनल में जगह बनाई है. जिसमें से वो सिर्फ दो बार खिताब जीत सका है.
इस लिस्ट में चौथे नंबर पर बांग्लादेश टीम है. बांग्लादेश ने कुल 3 बार एशिया कप के फाइनल में जगह बनाई है. लेकिन वो एक बार भी खिताब जीत नहीं सका है.
इसके अलावा अफगानिस्तान, नेपाल, यूएई और हांगकांग एशिया कप के इतिहास में कभी भी फाइनल में जगह नहीं बना पाए हैं. इस साल ये सभी टीमें इतिहास रचने के मंसूबे से उतरेंगी.
महाराष्ट्रात गणेशोत्सव हा फक्त धार्मिक किंवा सामाजिक सण नसून तो जनमानसाच्या भावना, श्रद्धा, भक्ती आणि उत्साह यांचा मिलाफ असतो. प्रत्येक घराघरात गजाननाचे आगमन म्हणजे आनंद, एकत्रितपणा आणि कुटुंबीयांसोबत साजरा होणारा सांस्कृतिक उत्सव. या पार्श्वभूमीवर राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
२७ ऑगस्ट २०२५ रोजी गणेश जयंती असून, त्यानिमित्त राज्यभर गणेशोत्सव मोठ्या भक्तीभावाने आणि जल्लोषात साजरा होणार आहे. या सणानिमित्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपला उत्सव निर्विघ्न, आनंदमय व कौटुंबिक सुखसोहळ्यासह पार पाडता यावा यासाठी, त्यांच्या ऑगस्ट महिन्याचे वेतन सप्टेंबरच्या ठरलेल्या तारखेला न देता गणेशोत्सवापूर्वीच आगाऊ देण्यात यावे, अशी ठाम मागणी कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार मा. श्री. ज्ञानेश्वर बारकु म्हात्रे (सर) यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
शिक्षणमंत्र्यांना निवेदन सादर
आ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री मा. दादाजी भुसे तसेच माननीय शिक्षण संचालकांना अधिकृत पत्राद्वारे निवेदन सादर केले आहे. निवेदनात त्यांनी स्पष्ट केले आहे की, वेतन वेळेवर किंवा आगाऊ मिळणे हे केवळ आर्थिक गरज नसून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मानसिक दिलासा आहे. कुटुंबाच्या गरजा, सणासुदीचे खर्च, मुलांचे शिक्षण आणि घरगुती जबाबदाऱ्या लक्षात घेता, वेतन उशिरा मिळाल्यास त्याचा थेट परिणाम त्यांच्या सामाजिक जीवनावर होतो.
अंशतः अनुदानित शाळांचा गंभीर प्रश्न
याचबरोबर, अंशतः अनुदानित शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मागील दोन महिन्यांचे वेतन अद्याप थकलेले असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणाच्या आधीही हे वेतन न मिळाल्याने या कर्मचाऱ्यांची आर्थिक अडचण अधिकच वाढली आहे. त्यामुळे शासनाने तातडीने या थकबाकी वेतनाची तरतूद करून ती गणेशोत्सवापूर्वी अदा करण्याची मागणी आ. म्हात्रे सरांनी जोरदारपणे केली आहे.
शिक्षक समाजाच्या अपेक्षा
गणेशोत्सव हा फक्त पूजा-अर्चा किंवा उत्सवापुरता मर्यादित नाही, तर तो एकत्रितपणे जगण्याचा संदेश देणारा सण आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे आपल्या संस्कृतीचे दीपस्तंभ मानले जातात. अशा स्थितीत त्यांना वेतन वेळेवर न मिळाल्यास त्यांचा उत्साह कमी होतो आणि सामाजिक समतोलावरही परिणाम होतो. त्यामुळे शासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी शिक्षक समाजाची एकमुखी अपेक्षा आहे.
गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करा
आ. म्हात्रे यांनी स्पष्ट केले की, “वेतन वेळेवर मिळाल्यासच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आपल्या परिवारासोबत सणाचा आनंद द्विगुणित करू शकतात. अन्यथा ‘वेतन नसेल तर सण कसा साजरा करणार?’ असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो.” त्यांच्या या भावनिक भूमिकेला राज्यभरातील शिक्षक संघटनांनीही पाठिंबा दिला आहे.
शासनाने तातडीने पावले उचलावीत
गेल्या काही महिन्यांपासून वेतनविषयक विलंबामुळे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. अनेकदा सण-उत्सव काळातच वेतन थकबाकीची समस्या निर्माण होत असल्याने ही बाब गंभीर झाली आहे. त्यामुळे शासनाने यापुढे ही समस्या उद्भवू नये यासाठी ठोस धोरण ठरविणे आवश्यक असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी मांडले आहे.
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. अशा उत्सवी वातावरणात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपले हक्काचे वेतन वेळेवर मिळावे हीच सर्वांची अपेक्षा आहे. आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या या आग्रही भूमिकेमुळे शासनाच्या कानावर हा प्रश्न पोहोचला असून, यापुढे शिक्षण विभागाने संवेदनशीलतेने निर्णय घेणे आवश्यक आहे.
शिक्षणक्षेत्रातील प्रत्येक घटक आज एका सुरात म्हणतो आहे – “वेतन मिळाले तरच सण साजरा होईल, अन्यथा आनंद अपूर्ण राहील.”