Tuesday, May 5, 2026
Home Blog Page 79

Changes in eid holidays in mumbai

0



Changes in eid holidays in mumbai.1578947368421&height=462&w=768&width=663

मुंबई (mumbai) शहर आणि उपनगरात मुस्लीम बांधवांच्या ईद-ए-मिलाद सणाच्या सुट्टी (holiday) दिवसात बदल करण्यात आला आहे. शुक्रवार पाच सप्टेंबर ऐवजी सोमवार आठ सप्टेंबर रोजी मुंबईत सार्वजनिक सुट्टी मिळणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात अधिसूचना काढली आहे. महाराष्ट्र शासनाने 2025 सालासाठी राज्यात एकूण 24 सार्वजनिक सुट्टया डिसेंबर 2024 मध्ये जाहीर केल्या होत्या.

राज्य (maharashtra) सरकारने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्टयांपैकी ईद-ए-मिलादची (Eid-E-Milad) सुट्टी शुक्रवार, दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी दर्शवली आहे. ईद-ए-मिलाद हा धार्मिक सण मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणात साजरा करतो. यानिमित्ताने जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

6 सप्टेंबर 2025 रोजी अनंत चतुर्दशीचा हिंदू सण असल्याने राज्यात बंधुता आणि हिंदू-मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी 21 ऑगस्ट 2025 रोजी विविध मुस्लिम संघटनांची बैठक झाली. या बैठकीत मुस्लिम समुदायाने सोमवार, दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी मिरवणुकीचा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

आता महाराष्ट्र सरकारने विशेष अधिकारांचा वापर करुन मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये शुक्रवार 5 सप्टेंबर ऐवजी सोमवार 8 सप्टेंबर 2025 हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर करण्यात येत आहे.

मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांसाठी शुक्रवार 5 सप्टेंबर ही सार्वजनिक सुट्टीची तारीख कायम ठेवण्यात येत आहे.


हेही वाचा

महाराष्ट्रात कामाचे तास 9 वरुन 12 तासांवर करण्यास परवानगी

0



महाराष्ट्रात कामाचे तास 9 वरुन 12 तासांवर करण्यास परवानगी.1578947368421&height=2867&w=768&width=3823

राज्य सरकार कामाचे तास वाढविण्याच्या योजनेवर काम करीत असल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कामगार विभागाने याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. अखेर यावर शिक्कामोर्तब करण्यात आला असून महाराष्ट्रात दिवसाचे कामाचे तास 9 वरुन 12 तासांवर करण्यात आले आहे. 

केंद्र शासनाच्या ease of doing business च्या धोरणाअंतर्गत देशात होणारे बदल लक्षात घेता कायद्यातील हे बदल उद्योग आणि कामगार या दोन्ही घटकांसाठी महत्त्वाचे असून उद्योग क्षेत्राला अधिक लवचिकता आणि कामगारांसाठीही पारदर्शक आणि नियोजित कामकाजासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे. 

कलम 65 मध्ये कामगारांच्या अतिरिक्त वेळेबाबत (ओव्हरटाईम) आता कमाल मर्यादा 115 तासांवरून 144 तासांपर्यंत वाढविण्यात आली आहे. यामुळे कामगारांना अधिकचा आर्थिक लाभ मिळणार आहे.

तसेच शासन मान्यतेशिवाय असा वेळेतील बदल कारखान्यांना परस्पर करता येणार नाही. त्याचबरोबर, आठवड्यात 48 तास काम ही कालमर्यादा ओलांडता येणार नसल्याचेही कामगार मंत्री ॲड.फुंडकर यांनी सांगितले आहे. कामगारांकडून जास्तीचे काम घेतल्यास त्याचा पुरेपूर मोबदला आणि पगारी सुट्ट्या देण्यासंबंधीचे बदल यात सुचविण्यात आल्याचं फुंडकर यांनी सांगितलं. 


हेही वाचा

मुंबईसाठी 238 वातानुकूलित लोकल ट्रेन खरेदी करण्यास मान्यता


ठाण्याहून नवी मुंबई गाठणे सोईस्कर पण खर्चिक

Approval for construction of 136 km of new tracks in mumbai urban transport project

0



Approval for construction of 136 km of new tracks in.1578947368421&height=768&w=768&width=1368

मुंबई (mumbai) शहरी वाहतूक प्रकल्प (MUTP-3B) अंतर्गत मुंबई रेल्वे विकास महामंडळाने प्रस्तावित केलेल्या 136.652 किमी लांबीच्या आणि 14,907 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली.

या खर्चाच्या 50 टक्के म्हणजेच 7,453 कोटी 73 लाख रुपये खर्च (Fund) करण्यासही मान्यता देण्यात आली.

मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प-3B अंतर्गत, बदलापूर-कर्जत (32.46 किमी) दरम्यान तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग, आसनगाव कसारा (34.966 किमी) दरम्यान चौथा रेल्वे मार्ग आणि पनवेल ते वसई (69.226 किमी) दरम्यान एक नवीन उपनगरीय रेल्वे मार्ग (tracks) बांधण्यात येईल.

हा उपनगरीय रेल्वे प्रकल्प मुंबई रेल्वे विकास महामंडळ बांधणार आहे. हा प्रकल्प “तातडीचा सार्वजनिक प्रकल्प” आणि “महत्वाकांक्षी शहरी वाहतूक प्रकल्प” म्हणून घोषित करण्यास मान्यता देण्यात आली.

तसेच, वांद्रे (पूर्व) येथील रेल्वे जमिनीच्या विकासातून उपलब्ध होणाऱ्या निधीपैकी 50 टक्के निधी राज्य सरकारच्या वाट्यानुसार आवश्यकतेनुसार समायोजित केला जाईल आणि उर्वरित निधी शहरी वाहतूक निधी (UTF) मध्ये जमा केला जाईल.

याशिवाय, केंद्राला MUTP-2 सारख्या या प्रकल्पातून रेल्वे तिकिटांवर अधिभार आकारण्याची आणि ही रक्कम राज्य सरकारच्या शहरी वाहतूक निधीमध्ये जमा करण्याची विनंती केली जाईल.


हेही वाचा

Special train between panvel and chiplun

0



Special train between panvel and chiplun.1578947368421&height=794&w=768&width=1370

गणेशोत्सव काळात प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता कोकण रेल्वे प्राधिकरणाने चिपळूण ते पनवेल (panvel) दरम्यान अनारक्षित विशेष मेमू गाड्या (special memu train) चालवण्याचा पर्याय निवडला आहे. या गाड्या बुधवारी 3 सप्टेंबर आणि गुरुवारी 4 सप्टेंबर रोजी कोकण रेल्वे (konkan railway) मार्गावर धावतील.

चिपळूण-पनवेल मेमू (ट्रेन क्रमांक 01160) सकाळी 11.05 वाजता चिपळूणहून (chiplun) निघेल आणि दुपारी 4.10 वाजता पनवेलला पोहोचेल. परतीच्या प्रवासादरम्यान, पनवेल-चिपळूण मेमू (ट्रेन क्रमांक 01159) दुपारी 4.40 वाजता पनवेलहून निघेल आणि त्याच दिवशी रात्री 9.55 वाजता चिपळूणला पोहोचेल.

ही अनोखी मेमू ट्रेन अंजनी, खेड, कळंबनी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासू, पेण, जिते, आपटा आणि सोमाटणे स्टेशनवर थांबेल. 8 डबे असलेली ही ट्रेन प्रवाशांसाठी फायदेशीर ठरेल आणि गणेशोत्सवाच्या काळात गणेशभक्तांना आराम देईल.

पेण आणि रोहा (roha) स्थानकांवर निवडक गाड्यांसाठी प्रायोगिक थांबा जाहीर करण्यात आला आहे. पेण येथे दिवा जंक्शन – सावंतवाडी रोड एक्सप्रेस आणि रोहा येथे दादर – सावंतवाडी रोड तुतारी एक्सप्रेस यांचा समावेश आहे, ज्यांच्या वेळा निश्चित आहेत.

हा उपक्रम 3 सप्टेंबर 2025 पासून सुरू होत आहे. प्रवाशांना या सेवांचा वापर करण्यास प्रोत्साहित केले जाते. अधिक माहितीसाठी http://www.enquiry.indianrail.gov.in/ ला भेट द्या.


हेही वाचा

मराठा आंदोलकांविरोधात तक्रार दाखल

0



मराठा आंदोलकांविरोधात तक्रार दाखल.1578947368421&height=768&w=768&width=1152

मरीन ड्राइव्ह येथील क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) मध्ये मराठा आरक्षण आंदोलकांच्या एका गटाने घुसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. फक्त आरोपच नाही तर याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली आहे. तसेच सुरक्षा रक्षकाला धमकावल्याचाही आरोप केला आहे. 

मरीन ड्राइव्ह पोलिसांनी ८-१० अज्ञात निदर्शकांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

शंकर नामदेव साळुंखे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ही घटना दिनशा वाच्छा रोडवरील गेट क्रमांक 9 वर घडली. गेट बंद असले तरी, आंदोलकांनी जबरदस्तीने आत जाण्याचा प्रयत्न केला असा आरोप आहे. साळुंखे यांनी दावा केला की निदर्शकांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या, “गेट उघडे ठेवा नाहीतर आम्ही रात्री अधिक लोकांसह परत येऊ, मग काय होते ते तुम्हाला दिसेल.”

पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम 189(1), 189(2), 189(3), 351(2), 223 आणि महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपींची ओळख पटविण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.

दरम्यान, शहरात मराठा आंदोलनाशी संबंधित अनेक घटना घडल्या आहेत. कालच्या आंदोलनादरम्यान झोन 1 पोलिसांनी आठ एफआयआर नोंदवले आहेत – ज्यामध्ये मरीन ड्राइव्ह येथे दोन, आझाद मैदान येथे तीन आणि एमआरए मार्ग, जेजे मार्ग, डोंगरी आणि कुलाबा पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक एफआयआर समाविष्ट आहे. सीसीआय घटनेचा आणि इतर संबंधित प्रकरणांचा तपास सुरू आहे.


हेही वाचा

ओबीसी संघटनेचे उपोषण सुरू


मराठा आंदोलनाचा दक्षिण मुंबईतील व्यवसायांवर परिणाम

ओबीसी संघटनेचे उपोषण सुरू

0



ओबीसी संघटनेचे उपोषण सुरू.1578947368421&height=390&w=768&width=439

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यावरून ओबीसी संघटनांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत.

मुंबईत जरांगे यांचे आंदोलन सुरू झाल्यानंतर नागपूरमध्ये ओबीसी संघटनांनी उपोषण सुरू केले आहे. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदींची तपासणी करण्यासाठी सरकारने समिती तयार केली आहे. जातीचे प्रमाणपत्र देताना काटेकोर चौकशी होणार असल्याने ओबीसींच्या हक्काला धक्का लागणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मात्र, यासोबतच तायवाडे यांनी साखळी उपोषण सुरूच राहील, हेही स्पष्ट केले. “आमची एक प्रमुख मागणी मान्य झाली असली, तरी इतर 13 मागण्या प्रलंबित आहेत. सरकारने आमच्याशी चर्चा करावी आणि पुन्हा एकदा लिखित हमी द्यावी की ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही. तसेच ‘वडिलोपार्जित नातेसंबंध’ या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट करावा, ही आमची महत्त्वाची मागणी असेल असेही त्यांनी सांगितले.

कायद्याचा अभ्यास करून, तज्ज्ञांचा सल्ला घेऊन, गरज भासल्यास न्यायालयाचा मार्ग अवलंबण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. शासन निर्णय नीट वाचून त्यावरच अंतिम भूमिका ठरवली जाईल. जितके नेते तितकी मते असू शकतात,” असे ते म्हणाले.


हेही वाचा

आपण जिंकलो… मनोज जरांगेंची घोषणा


उच्च न्यायालयाचा मराठा आंदोलकांना अल्टिमेटम

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com