Wednesday, March 11, 2026
Home Blog Page 57

Raj thackeray inspects meenatai thackeray’s statue

0



Raj thackeray inspects meenatai thackerays statue.1578947368421&height=768&w=768&width=1368

दादरच्या (dadar) शिवाजी पार्कमध्ये काही लोकांनी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्यानंतर राजकीय तणाव निर्माण झाला. हा पुतळा शिवाजी पार्क उद्यानाच्या प्रवेशद्वारावर आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या (uddhav thackeray) पक्षाचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी रंग काढून टाकला. ही घटना पहाटे घडली. दुपारपर्यंत शिवसेना उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मीनाताईंच्या पुतळ्याची साफसफाई केल्यानंतर त्यावर हार घालली.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, उद्यानात 24/7 सुरक्षा रक्षक नेहमीच तैनात असतात त्यामुळे ही विकृत घटना कशी काय घडली याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. 

यावेळी मनसेप्रमुख राज ठाकरे (raj thackeray) यांनी मीनाताई ठाकरे (Meenatai Thackeray) पुतळा परिसरात जी घटना घडली त्याची संपूर्ण माहिती घेतली. या परिसरात नेमके काय घडलं आणि आतापर्यंत पोलिसांकडून (Police) काय कारवाई करण्यात आली हे देखील त्यांनी जाणून घेतले. त्यानंतर 24 तासांच्या आत पुतळ्यावर रंग टाकणाऱ्याला शोधा अशी विनंती राज ठाकरेंनी पोलिसांना केली.

दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे शाखाप्रमुखांच्या बैठकीआधी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी भेट देणार आहेत. तसेच त्यांनी स्थानिक पदाधिकार्‍यांकडून मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याच्या ठिकाणी काय झालं, याची माहिती घेतली आहे.


हेही वाचा

Asia Cup 2025: मुस्तफिजुर रहमान की घातक गेंदबाजी, बांग्लादेश-अफगानिस्तान का मैच कौन जीता, जानिए

0


एशिया कप 2025 में मंगलवार को अबू धाबी के शेख जायद क्रिकेट स्टेडियम में खेले गए मुकाबले में बांग्लादेश ने अफगानिस्तान को 8 रन से हराकर टूर्नामेंट में खुद को जिंदा रखा है.

अफगानिस्तान को जीत के लिए 155 रन का लक्ष्य मिला था. अफगान टीम 20 ओवर में 146 रन पर सिमट गई और 8 रन से मैच हार गई. अफगानिस्तान के टॉप ऑर्डर के बल्लेबाज सेदिकुल्लाह अटल शून्य और इब्राहिम जादरान 5 रन बनाकर आउट हुए. दोनों की असफलता अफगानिस्तान टीम की हार का कारण बनी.

विकेटकीपर बल्लेबाज रहमानुल्लाह गुरबाज 35 रन बनाकर शीर्ष स्कोरर रहे. अजमतुल्लाह उमरजई ने 30 और कप्तान राशिद खान ने 20 रन बनाए. शेष कोई भी बल्लेबाज बांग्लादेश के गेंदबाजों का सामना नहीं कर सका.

बांग्लादेश के लिए अनुभवी तेज गेंदबाज मुस्तफिजुर रहमान ने बेहतरीन गेंदबाजी की और 4 ओवर में 28 रन देकर 3 विकेट लिए. नासुम अहमद, तस्कीन अहमद और रिशाद हुसैन ने 2-2 विकेट लिए.

इससे पहले टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करते हुए बांग्लादेश ने 5 विकेट पर 154 रन बनाए थे. सलामी बल्लेबाजों सैफ हसन और तंजीद हसन ने मजबूत शुरुआत दी और पहले विकेट के लिए 6.4 ओवर में 63 रन जोड़े. सैफ हसन 28 गेंद पर 30 रन बनाकर आउट हुए. तंजीद हसन ने 31 गेंद पर 3 छक्के और 4 चौके की मदद से 52 रन बनाकर आउट हुए. कप्तान लिटन दास 11 गेंद पर 9, शमीम हुसैन 11 गेंद पर 11 और तौहीद ह्रदोय 20 गेंद पर 26 रन बनाकर आउट हुए. जाकेर अली और नुरूल हसन ने नाबाद 12-12 रन बनाए.

अफगानिस्तान के लिए कप्तान राशिद खान ने शानदार गेंदबाजी की और 4 ओवर में 26 रन देकर 2 विकेट लिए. नूर अहमद ने भी 4 ओवर में 23 रन देकर 2 विकेट लिए. उमजरई ने 1 विकेट लिए.

Asia Cup में भारत का अगला मैच कब और किसके साथ? जानें तारीख, टाइमिंग और वेन्यू समेत सारी डिटेल

0


एशिया कप 2025 टूर्नामेंट की शुरुआत से पहले ही भारत को ट्रॉफी जीत का प्रबल दावेदार माना जाने लगा था. टी20 में दुनिया की नंबर-1 टीम ने अब तक डिफेंडिंग चैंपियन की तरह ही प्रदर्शन किया है. पहले मैच में उसने यूएई को 9 विकेट से हराया था, फिर पाकिस्तान को 7 विकेट से हराया. भारतीय टीम के दो जीत के बाद 4 अंक (Asia Cup Points Table India) हैं और सुपर-4 के लिए क्वालीफाई कर चुकी है. अब सवाल है कि भारत का अगला मैच कब और किसके साथ है?

भारत का अगला मैच कब और किसके साथ?

भारतीय टीम का अगला मैच ओमान के साथ होना है, जो 19 सितंबर को अबू धाबी स्थित शेख जायद स्टेडियम में खेला जाएगा. भारत ने अब तक एशिया कप में अपने दोनों मैच दुबई स्टेडियम में खेले हैं, इसलिए अबू धाबी का वेन्यू उसके लिए नई चुनौती हो सकती है. इस मैच को जीतने से भारत का ग्रुप A में पहले स्थान पर रहना निश्चित हो जाएगा.

  • भारत का अगला मैच – 19 सितंबर बनाम ओमान

भारत और ओमान का ये ग्रुप मैच 19 सितंबर को रात 8 बजे से शुरू होगा. बताते चलें कि ओमान इस मैच को जीत भी लेता है तो उसे कोई फायदा नहीं होगा, क्योंकि उसका सुपर-4 में जाना अब नामुमकिन है.

अब तक 2 टीम एलिमिनेट

एशिया कप 2025 में कुल आठ टीम खेल रही हैं, जिनमें से अब तक सिर्फ भारत ने सुपर-4 के लिए क्वालीफाई किया है. दूसरी ओर हॉन्ग कॉन्ग और ओमान, एलिमिनेट हो चुके हैं. यानी दोनों ग्रुप में अब भी 5 टीमों के बीच सुपर-4 की लड़ाई जारी है. बांग्लादेश, अफगानिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका और यूएई, इन पांच टीमों में से सिर्फ 3 ही अगले चरण के लिए क्वालीफाई कर सकेंगी.

यह भी पढ़ें:

BAN vs AFG: अफगानिस्तान को हराने के लिए बांग्लादेश ने करवाई खूंखार गेंदबाज की वापसी, मैदान पर बवाल मचना तय

प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे?

0



प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे.1578947368421&height=1632&w=768&width=2448

प्रभादेवीतील रेल्वे पूल शुक्रवारपासून मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अटल सेतू आणि वरळी सी लिंक यांना जोडण्यासाठी या पुलाचे पाडकाम होणार आहे.

पुलाचे पाडकाम सुरू होणार असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर, पुलाच्या मधोमध असलेले पश्चिम रेल्वेचे तिकीट आरक्षण कार्यालय देखील हलविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत असून रेल्वेकडून त्यासाठी तयारी केली जात आहे.

रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील दोन ते तीन दिवसांत नवीन जागा निश्चित करून तिकीट आरक्षण कार्यालय हलवले जाणार आहे.

एप्रिल महिन्यात पूल वाहतुकीसाठी बंद करून पाडण्याचा निर्णय घेतल्यामुळे तिकीट काउंटर आधीच दुसऱ्या ठिकाणी हलविण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र पुलाचे पाडकाम उशिरा झाल्याने हे स्थलांतर थांबले होते.

आता पुल वाहतुकीसाठी बंद झाल्यानंतर पुन्हा एकदा कार्यालय हलविण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. मध्य रेल्वेवरील परळ स्थानकातील तिकीट कार्यालय यापूर्वीच हलवण्यात आले आहे; तसेच लवकरच पश्चिम रेल्वेवरील स्थानकातील तिकीट आरक्षण कार्यालयही स्थलांतरित केले जाणार आहे.


हेही वाचा

कोकण रेल्वेचे नवीन मोबाईल अॅप लॉंच


CSMT जवळच्या ‘खाऊ गल्ली’ची जागा बदलणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश

0



स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे.1578947368421&height=224&w=768&width=400

बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अंतिम मुदत मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाने (bombay high court) 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुक प्रक्रिया निकालासह पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणुक प्रक्रिया येत्या काही काळात होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाला ग्रामपंचायत, नगरपंचायत, महानगरपालिका या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या चार महिन्यात घेण्याचे आदेश यापूर्वी देण्यात आले होते. पण ही मुदतही संपत आली पण अद्याप निवडणुका घेतल्या गेल्या नाहीत.

निवडणूक आयोगाने आणखीन काही महिन्यांची मुदतवाढ मिळावी यासाठी कोर्टात याचिका केली होती. त्यानुसार न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका घेण्याचे निर्देश दिले. 

यासोबत न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारले. यापूर्वी दिलेल्या चार महिन्यात निवडणुका का घेतल्या गेल्या नाहीत? असा प्रश्नही उपस्थित केला. सप्टेंबर आणि डिसेंबर इतका कालावधी तुम्हाला कशासाठी हवा, अशी विचारणा करण्यात आली. 

यावर राज्य सरकारने आपली बाजू मांडताना कर्मचाऱ्यांची कमतरता आणि सणांचे कारण पुढे केले. आमच्याकडे ईव्हीएम यंत्रे ही नोव्हेंबर महिन्यात उपलब्ध होणार आहेत. याशिवाय, सध्या प्रभाग रचनेचे काम सुरु आहे. ही प्रक्रिया मोठी असल्याने ती पूर्ण होण्यासाठी वेळ लागत आहे. त्यामुळे आम्हाला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाने केली होती. 


Smart solar bench stablished at st. xavier college mumbai

0



Smart solar bench stablished at st xavier college mumbai.1578947368421&height=720&w=768&width=1280

मुंबईतील (mumbai) सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये (St Xavier’s college) एक खास ‘स्मार्ट सोलर बेंच’ (Smart solar bench) बसवण्यात आला आहे. हा बेंच सौरऊर्जेवर (Solar electricity) चालतो तसेच इतर अनेक आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे.

कॉलेजच्या झेवियर्स इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशनच्या प्रवेशद्वाराजवळ हा बेंच बसवण्यात आला आहे आणि त्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना आणि कॉलेज कॅम्पसमधील लोकांना आधुनिक सुविधा प्रदान करणे आहे.

हे स्मार्ट बेंच अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. यात इनबिल्ट वाय-फाय राउटर आहे, ज्यामध्ये एकाच वेळी 100 मोबाईल फोन किंवा लॅपटॉप इंटरनेटशी जोडण्याची क्षमता आहे. याद्वारे विद्यार्थी आणि प्राध्यापक त्यांच्या अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी इंटरनेटचा सहज वापर करू शकतील.

याशिवाय, बेंचमध्ये वायरलेस चार्जिंगची सुविधा देखील आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना चार्जिंग केबलची आवश्यकता भासणार नाही. तसेच, पारंपारिक चार्जिंगसाठी यूएसबी पोर्ट देखील प्रदान करण्यात आले आहेत.

हे स्मार्ट बेंच अतिशय विचारपूर्वक डिझाइन केले आहे. ते एक विशेष अल्गोरिथम वापरते जे उन्हाळ्याच्या दिवसात अतिरिक्त बॅटरी पॉवर साठवते.

याचा अर्थ असा की ढगाळ किंवा कमी सूर्यप्रकाश असलेल्या दिवसांमध्येही या बेंचवरील सुविधा कोणत्याही व्यत्ययाशिवाय चालू राहतील. यामुळे केवळ ऊर्जा बचत होणार नाही तर कोणत्याही हवामानात बेंच वापरता येईल.


हेही वाचा

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com