Sunday, March 8, 2026
Home Blog Page 51

Mumbai ranks second with 44,873 crime cases registered, reveals ncrb data

0



Mumbai ranks second with 44873 crime cases registered reveals ncrb.1578947368421&height=600&w=768&width=778

राष्ट्रीय गुन्हे (crimes) नोंद ब्युरो (NCRB) च्या ताज्या अहवालानुसार, 2023 मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत देशात सर्वाधिक 763 प्रकरणे राज्यात नोंदवली गेली होती.

कॉपीराइट उल्लंघनाच्या प्रकरणांमध्येही राज्य अव्वल स्थानावर होते. राज्यात अशी 335 प्रकरणे नोंदली गेली ज्यात 340 लोकांनी बळी असल्याचा दावा केला आहे, असे अहवालात म्हटले आहे.

भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये 216 प्रकरणांसह उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर होता. 2023 मध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत 960 प्रकरणे नोंदवून महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर होता.

21,870 आयटी कायद्याच्या प्रकरणांसह कर्नाटक अव्वल स्थानावर होता. कॉपीराइट कायद्यांतर्गत महाराष्ट्रात (maharashtra) सर्वाधिक (335) प्रकरणे नोंदली गेली.

तसेच कर्नाटक 204 प्रकरणांसह आणि उत्तर प्रदेश 198 प्रकरणांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर होता, असे अहवालात म्हटले आहे.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत अनुसूचित जातींवरील गुन्ह्यांचा विचार केला तर, महाराष्ट्र 340 प्रकरणांसह देशात दुसऱ्या क्रमांकावर होता.

तसेच उत्तर प्रदेशात अनुसूचित जातींवरील गुन्ह्यांची 2771 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.


हेही वाचा

Hc orders maharashtra to publish school safety compliance by october 9

0



Hc orders maharashtra to publish school safety compliance by october.1578947368421&height=768&w=768&width=1368

13 मे रोजी जारी केलेल्या सरकारी ठरावात (GR) शालेय सुरक्षा उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत माहिती नमूद करण्यात आली.

ही माहिती 9 ऑक्टोबरपर्यंत त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड करण्याचे निर्देश मुंबई (mumbai) उच्च न्यायालयाने (bombay high court) महाराष्ट्र राज्य सरकारला दिले आहेत.

शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि भूतकाळातील घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी स्थापन केलेल्या दोन निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील सात सदस्यीय समितीच्या शिफारशींवर हे उपाय आधारित होते.

न्यायालयाला माहिती देण्यात आली की आतापर्यंत सुमारे 40% शाळांनी अधिकृत पोर्टलवर अनुपालन डेटा अपलोड केला आहे. तर सर्व शाळांकडून माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

जीआरमध्ये व्हॉट्सअॅप किंवा ईमेलद्वारे पालकांना माहिती देणे आणि शाळांमध्ये (school) सखी-सावित्री समित्या आणि विद्यार्थी सुरक्षा समित्या स्थापन करणे यासारख्या तरतुदींचाही समावेश आहे.

न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला की, ही वेबसाइट पालकांना प्रत्येक शाळेच्या अनुपालनाची पडताळणी करण्याची परवानगी देते का? आणि अनुपालन न करणाऱ्या शाळांविरुद्ध केलेल्या कारवाईचा डेटा सार्वजनिकरित्या उपलब्ध आहे का? या मुद्द्यांवर सरकारकडून स्पष्ट उत्तरे मागितली.

महत्त्वाचे म्हणजे शिक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्याने न्यायालयात कबूल केले की, त्यांनी वेबसाइटचे वैयक्तिकरित्या पुनरावलोकन केले नव्हते. ज्यामुळे देखरेख आणि अंमलबजावणीबद्दल चिंता निर्माण झाली.


हेही वाचा

गोरेगाव: दादासाहेब फाळके फिल्मसिटीमध्ये 360-डिग्री सिनेमाचे उद्घाटन

0



गोरेगाव दादासाहेब फाळके फिल्मसिटीमध्ये 360 डिग्री सिनेमाचे उद्घाटन.1578947368421&height=467&w=768&width=700

गोरेगाव पूर्वेकडील दादासाहेब फाळके फिल्मसिटीमध्ये असलेल्या बॉलीवूड पार्क येथे 360 डिग्री सिनेमाचे उद्घाटन करण्यात आले.

महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री अधिवक्ता आशिष शेलार यांच्या हस्ते मनोरंजन उद्योगातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. 

उद्घाटन प्रसंगी बोलताना आशीष शेलार यांनी 360-डिग्री सिनेमाबाबत सांगितले की, ही नाविन्यपूर्ण सुविधा फक्त पर्यटकांसाठी नवीन अनुभव देणार नाही. तर महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि पर्यटन ओळख अधिक दृढ करण्यासही मदत करेल. त्याचबरोबर, या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना चित्रपटाच्या कथेत स्वतः सहभागी असल्यासारखा अनुभव मिळणार आहे, ज्यामुळे त्यांचा मनोरंजनाचा अनुभव अधिक जिवंत होईल.

बॉलीवूड पार्कचे संस्थापक संतोष मिजगर यांनी यावेळी सांगितले की, 360-डिग्री सिनेमामुळे प्रेक्षक समुद्राच्या तळाशी डुबकी मारत असल्याचा, अवकाशात उड्डाण करत असल्याचा किंवा जंगल सफारीत सहभागी असल्याचा अनुभव प्रत्यक्षात घेतल्यासारखा वाटतो.
यासोबतच, विज्ञान, निसर्ग आणि साहसाशी संबंधित चित्रपट हे मुलांसाठी शिक्षण आणि मनोरंजन यांचा संगम साधतात. तर कुटुंबीयांसाठीही हा अनुभव संपूर्ण आनंद देतो. अत्याधुनिक हाय-डेफिनिशन प्रोजेक्शन, 3डी/7डी इफेक्ट्स आणि सराउंड साऊंड यामुळे अनुभव आणखी जिवंत बनतो, असे मिजगर यांनी स्पष्ट केले

या नव्या आकर्षणामुळे मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माहिती, मनोरंजन तसेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अनुभव घेता येईल. फिल्मसिटी येथील बॉलीवूड पार्क हा पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण केंद्र ठरत आहे.


अंधेरी मेट्रो स्टेशनवर हिंदी जाहिरात फलकाची मनसेकडून तोडफोड

0



अंधेरी मेट्रो स्टेशनवर हिंदी जाहिरात फलकाची मनसेकडून तोडफोड.1578947368421&height=630&w=768&width=737

अंधेरी पोलिसांनी सोमवारी अंधेरी मेट्रो स्थानकावरील एका होर्डिंगची तोडफोड केल्याच्या आरोपावरून मनसेच्या दोन कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा नोंदवला. हिंदी जाहिरातींच्या वापराविरोधात मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी स्थानकात आंदोलन केले होते.

पोलिसांनी रमेश खारपे आणि रवींद्र इंदोरकर (दोघेही वय अंदाजे 30 वर्षे) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. त्यांच्यावर कलम 72 (सार्वजनिक नोटिसा बदनाम करणे, म्हणजे कोणत्याही सार्वजनिक नोटिसेला जाणूनबुजून हानी पोहोचवणे, पुसून टाकणे किंवा बदलणे हा दंडनीय गुन्हा), मेट्रो रेल्वे (ऑपरेशन आणि मेंटेनन्स) कायद्यातील कलम 3, तसेच भारतीय न्याय संहितेतील कलम 324 (मिसचीफ) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी दोघांनाही नोटीस बजावली आहे.

मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी अंधेरी मेट्रो स्थानकात हिंदी जाहिरातींविरोधात आंदोलन केले. या घटनेत कार्यकर्त्यांनी स्थानकावरील फलकावर काळे फासले आणि काही होर्डिंग्जची तोडफोड केली. त्यांचे म्हणणे आहे की महाराष्ट्र आणि मुंबईतील मेट्रो स्थानकांवर मराठी जाहिरातींनाच मान्यता द्यावी, कारण मराठी ही राज्यभाषा आहे.

कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे की, भविष्यात कोणत्याही मेट्रो स्थानकावर हिंदी जाहिराती लावल्या गेल्यास अशाच प्रकारचे आंदोलन केले जाईल. मराठी व्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील जाहिराती महाराष्ट्रात मान्य केल्या जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा

दसरा मेळाव्यानिमित्ताने वाहतुकीत मोठे बदल, या रस्त्यांवर NO Entry!

Direct flight from mumbai to solapur

0



Direct flight from mumbai to solapur.1578947368421&height=1534&w=768&width=2606

पश्चिम महाराष्ट्रातील (maharashtra) महत्त्वाचे शहर असणारे सोलापूर हे मुंबईतील (mumbai) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाशी (csmia) हवाई मार्गाने जोडले जाणार आहे.

स्टार एअर या खाजगी विमान कंपनीने 15 ऑक्टोबरपासून दोन्ही शहरांमध्ये थेट उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे. मुंबई ते सोलापूर (solapur) या पहिल्या विमान उड्डाणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) हिरवा झेंडा दाखवतील.

मुंबईहून दुपारी 12:50 वाजता उड्डाणे होतील आणि सोलापूरला दुपारी 2.10 वाजता पोहोचतील. परतीच्या विमाने सोलापूरहून (solapur) दुपारी 2.40 वाजता निघतील आणि मुंबईत दुपारी 3:45 वाजता पोहोचतील.

3,999 रुपयांच्या तिकिटांच्या या विमानांची तिकिटे आठवड्यातून चार दिवस उड्डाण करणार आहेत. हे विमान मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी राज्य प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत चालवली जातील.

या योजनेअंतर्गत कनेक्टिव्हिटी वाढवणे, प्रादेशिक आर्थिक वाढीला पाठिंबा देणे. तसेच व्यवसायिक आणि सर्वसामान्य प्रवाशांना सेवा देणे शक्य होईल.

“सोलापूर हे आमच्या वाढत्या नेटवर्कवरील 31 वे शहर असेल,” असे स्टार एअरच्या मुख्य व्यावसायिक आणि विपणन अधिकारी शिल्पा भाटिया म्हणाल्या.

“सोलापूर हे उद्योग, शिक्षण आणि संस्कृतीसाठी एक महत्त्वाचे केंद्र आहे आणि ही नवीन सेवा केवळ प्रवाशांचा वेळ वाचवणार नाही तर मुंबईशी व्यापार आणि पर्यटन संबंध देखील मजबूत करेल.” असेही म्हणाले.


हेही वाचा

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक डिसेंबर 2025 पर्यंत सुरू होण्याची शक्यता

0



मुंबई पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक डिसेंबर 2025 पर्यंत सुरू होण्याची शक्यता.1578947368421&height=768&w=768&width=1368

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक प्रकल्प आता पूर्णत्वाच्या मार्गावर असून डिसेंबर 2025 पर्यंत खुला होण्याची अपेक्षा आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळ (एमएसआरडीसी) या 13.3 किलोमीटर लांबीच्या, आठ-लेनच्या नवीन रस्त्याचे बांधकाम करत आहे. यामुळे मुंबई आणि पुणे यांच्यातील प्रवासाचा कालावधी सुमारे 30 मिनिटांनी कमी होणार आहे.

नव्या मार्गामुळे प्रवास जवळपास सहा किलोमीटरने कमी होईल आणि वाहनांना ताशी 120 किमी या वेगाने प्रवास करता येईल.

अहवालानुसार, एका बोगद्याचा मार्ग लोनावळा तलावाखालून जातो, तर एक नवा पूल लवकरच या परिसराचा आकर्षणबिंदू ठरणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी भेट दिली असून त्यांनी अभियांत्रिकी कामाचे कौतुक केले.

तसेच सुरक्षेच्या महत्त्वावर भर दिला. या प्रकल्पामुळे उद्योग, पर्यटन, रिअल इस्टेट आणि लॉजिस्टिक्सला चालना मिळून पश्चिम महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार आहे.

2019 मध्ये सुरू झालेल्या या बांधकामाला कठीण भूप्रदेश आणि प्रकल्पाचा मोठा आकार यामुळे विलंब झाला.

सध्या 96% काम पूर्ण झाले आहे. पूल आणि दुसरा व्हायाडक्ट जवळपास तयार झाले आहेत. तर बोगदे आणि पहिला व्हायाडक्ट पूर्णत्वास पोहोचले आहेत.

अंतिम टप्प्यात सुरक्षा तपासण्या केल्या जातील, ज्यामध्ये आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग, वायुवीजन, प्रकाशयोजना, निरीक्षण प्रणाली यांचा समावेश आहे. तसेच औपचारिक परवानग्या घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.


PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com