Monday, June 16, 2025
HomeSportsPakistan cricketer Babar Azam is linked to Pahalgam terror attack viral post...

Pakistan cricketer Babar Azam is linked to Pahalgam terror attack viral post manipulated see Fact Check | पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी क्रिकेटपटू बाबर आझमचा संबंध? लष्कराने प्रसिद्ध केलेल्या स्केचने सगळ्यांनाच बसला धक्का


Pakistani Cricketer Babar Azam Connection: काश्मीरमधील पहलगाम येथे अलीकडेच भ्याड दहशतवादी हल्ला झाला. यावेळी निष्पाप लोकांची हत्या करण्यात आली. या दहशतवादी हल्ल्याबाबत संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराकडून दहशतवाड्यांची शोध मोहीम सुरू आहे. या शोध मोहिमेदरम्यान भारतीय लष्कराने पहलगामवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी केले आहेत. आता या स्केचेसवरून सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या चर्चा रंगल्या आहेत. या स्केचेसमध्ये दिसणाऱ्या एका दहशतवाद्याच्या फोटोची तुलना नेटिझन्स पाकिस्तानी क्रिकेटपटू बाबर आझमच्या फोटोशी करत आहेत. ज्याचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

काय आहे सत्य? 

डॉन या तथ्य तपासणी म्हणजेच फॅक्ट चेक करणाऱ्या वेबसाइटच्या वृत्तानुसार, बुधवार, 23 एप्रिल रोजी सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला, जे पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांचे रेखाचित्र होते. त्यातील एकाच स्केच बघून लोकांनी बोलायला सुरुवात केली की की हे चित्र पाकिस्तानी क्रिकेटपटू बाबर आझमसारखे दिसते. परंतु, यात काहीही तथ्य नाही. रिपोर्ट्सनुसार, हा व्हायरल फोटो एडिट करण्यात आला आहे. लष्कराने प्रसिद्ध केलेला फोटो बाबर आझमच्या फोटोसारखा अजिबात दिसत नाही.

हे ही वाचा: IPL 2025: ‘हे योग्य नाही…’, सनरायझर्सविरुद्धच्या पराभवानंतर धोनी संतापला, कोणाला धरले जबाबदार?

 

पाकिस्तानी क्रिकेटपटू बाबर आझमचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी कोणताही संबंध नसल्याचे फॅक्ट चेकमधून समोर आले आहे. लष्कराने जारी केलेल्या दहशतवाद्याचा फोटो पाकिस्तानी खेळाडूशी जुळत नाही.

हे ही वाचा: “अर्शद नदीमला आमंत्रित करण्याच्या माझ्या निर्णयाबद्दल…”; ट्रोलिंगनंतर नीरज चोप्राचं स्पष्टीकरण

पहलगाम दहशतवादी हल्ला

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या एका गटावर गोळीबार केल्यानंतर, २६ जणांचा मृत्यू झाला. यातील बहुतेक लोक हे ज्यामध्ये बहुतेक पर्यटक होते. या प्राणघातक हल्ल्यांनंतर, जगभरात याचा निषेध केला जात आहे. भारतीय क्रिकेट खेळाडूंनीही हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे. विराट कोहलीनेही या हल्ल्याला भ्याड म्हटले आहे तर अनेक क्रिकेटपटूंनी सोशल मीडियाद्वारे या घटनेवर दुःख व्यक्त केले.





Source link

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

PHP Code Snippets Powered By : XYZScripts.com